कागलमध्ये अवकाळी पावसाचा तडाखा, जनजीवन विस्कळीत!

कागल (सलीम शेख): कागल शहरात सोमवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली. विजांच्या कडकडाटासह आलेल्या या पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले. सोमवारी कागलमध्ये आठवडी बाजार असल्याने शेतकऱ्यांचे आणि व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.सुमारे तासभर पडलेल्या या पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी साचले होते, तर अनेक ठिकाणी रस्त्यांवरून पाणी वाहत होते. त्यामुळे वाहतुकीलाही अडथळा निर्माण झाला होता. बाजारपेठेत अनेक ठिकाणी पाणी साचल्याने शेतकऱ्यांच्या आणि व्यापाऱ्यांच्या मालाचे मोठे नुकसान झाले.अवकाळी पावसामुळे शहरातील वीजपुरवठा वारंवार खंडित झाला. त्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला.पावसामुळे वातावरणात काही काळ गारवा निर्माण झाला असला, तरी त्यानंतर लगेचच तापमानात मोठी वाढ झाली. त्यामुळे नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागला.