कोल्हापूर शहराच्या हद्द्दद वाढीसाठी कोल्हापूरत बैठक संपन्न!

कोल्हापूर (सलीम शेख) : कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीसंदर्भात राजारामपुरी लकी बझार येथे झालेल्या सर्वपक्षीय बैठकीतील मनसेच्या भूमिकेविषयी माहिती देण्यात आली.मनसेची आक्रमकपणे म्हणने मांडले. कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीची गरज का आहे, याबद्दल मनसेचे राजू जाधव यांनी अभ्यासपूर्ण आणि आक्रमक भूमिका मांडली.त्यांनी हद्दवाढीचे महत्त्व पटवून देत, शहराच्या विकासासाठी ती किती आवश्यक आहे, हे सविस्तरपणे सांगितले. मनसेच्या या आक्रमक आणि अभ्यासपूर्ण भूमिकेचे सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी आणि नागरिकांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले.
कोल्हापूर शहराचा विकास झपाट्याने होत आहे, त्यामुळे शहराची हद्द वाढवणे गरजेचे आहे. हद्दवाढीमुळे शहराला अधिक जागा उपलब्ध होईल, ज्यामुळे नवीन विकास योजना राबवता येतील. हद्दवाढीमुळे शहराच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करणे शक्य होईल. शहराची हद्दवाढ झाल्यास, कोल्हापूरचा अधिक विकास होईल. कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. या विषयावर अनेकदा वादविवाद झाले आहेत.शहरी आणि ग्रामीण असा वाद लोकप्रतिनिधीकडून लावला जात असल्याचा आरोप होत आहे. जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या निवडणुका झाल्यानंतरच हद्द वाढ बाबतची भूमिका घ्यायची, अशी ग्रामीण लोकप्रतिनिधींची मानसिकता आहे.मनसेची भूमिका महत्वाची का आहे.मनसेने या विषयावर अभ्यासपूर्ण भूमिका मांडल्यामुळे नागरिकांमध्ये जनजागृती झाली आहे. मनसेच्या आक्रमक भूमिकेमुळे प्रशासनावर दबाव निर्माण झाला आहे. मनसेच्या भूमिकेमुळे हद्दवाढीच्या प्रक्रियेला गती मिळण्याची शक्यता आहे.