महाराष्ट्र ग्रामीण

तामगावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनधिकृत पुतळ्यामुळे तणाव, प्रशासनाकडून हटवण्याचे आवाहन!

तामगाव (सलीम शेख) : तामगाव येथील संत श्री ज्ञानेश्वर वाचनालयाच्या जागेत छत्रपती शिवाजी महाराजांचा अंदाजे पाच बायच्या जागेत पाच फुटी उंचीचा अनधिकृत पुतळा बसवल्याने गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाला याची माहिती मिळताच तामगाव ग्रामपंचायतीचे अधिकारी तातडीने गावात दाखल झाले.


प्रशासनाने गावकऱ्यांच्या बैठकीत पुतळा रितीरिवाजाप्रमाणे एकत्र येऊन काढण्याची विनंती केली. मात्र, हा पुतळा कोणी आणि कधी बसवला, याची माहिती ग्रामस्थांकडून मिळू शकली नाही. वाचनालयाचे सदस्य, ग्रामपंचायत सदस्य आणि नागरिक यांच्यात सुमारे दिवसभर वारंवार चर्चा झाली, परंतु कोणताही तोडगा निघाला नाही. त्यामुळे पुतळ्याच्या सुरक्षिततेची जबाबदारी प्रशासनावर आली आहे.
पुतळ्याची जबाबदारी कोणीही घेण्यास तयार नसल्याने प्रशासनाने ग्रामपंचायतीला दोन दिवसांची मुदत दिली असून, त्यानंतर पुतळा स्वतःहून हटवण्याची विनंती केली आहे.


यावेळी पोलीस प्रशासनाकडून सुजितकुमार क्षीरसागर, गोकुळ शिरगाव पोलीस स्टेशनचे निरीक्षक टी. जे. मगदूम, नायब तहसीलदार भालचंद्र यादव, प्रांत अधिकारी प्रसाद चौगुले, तलाठी नीलंबरी पवार, ग्रामसेवक अशोक मुसळे, संदीप पवार, तामगावच्या सरपंच सुरेखा हराळे, उपसरपंच महेश जोंधळेकर, ग्रामपंचायत सदस्य आणि मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते.
आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असल्याने, खबरदारीचा उपाय म्हणून पुतळ्याला दोन दिवसांसाठी पोलीस बंदोबस्त पुरवण्यात आला आहे. प्रशासनाने २ तारखेनंतर पुतळा हटवण्याची अंतिम सूचना दिली आहे. या घडामोडींमुळे तामगावात सध्या तणावपूर्ण शांतता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button