महाराष्ट्र ग्रामीण

अनिसच्या वतीने दोन महिला झाल्या जटा मुक्त.

कोल्हापूर (सुभाष भोसले): महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने शांताबाई कांबळे रा. कणेरी ता. पन्हाळा,व मालन संभाजी खामकर रा. भोसे तालुका मिरज जि सांगली यांना जटा मुक्त करण्यात आले. सदर महिला अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या संपर्कात आल्या.सीमा पाटील व गीता

हासुरकर यांनी या महिलांना जटा मुक्त केले, सदरचा कार्यक्रम आकार गार्डन ताराबाई पार्क येथे संपन्न झाला.
यापूर्वी सुद्धा कित्येक महिलांना समितीच्या सीमा पाटील यांनी जटा मुक्त केले.
केसांची व्यवस्थित निगा न राखल्यामुळे केसांमध्ये गुंता वाढतो व जट तयार होते, जटीची जोपासना अंधश्रद्धेतून होते. कणेरी गावातील बबन कांबळे यांनी प्रशांत आंबी यांच्याशी संपर्क केला, तसेच सदर महिलेस जट काढण्यासाठी प्रवृत्त करण्यात आले.
यावेळीरमेश वडणगेेकर, खगोल अभ्यासक किरण गवळी, सीमा पाटील गीता हसुरकर, रेखा सपाटे विद्या गायकवाड, राजू संभाजी खामकर, संभाजी हरी खामकर
आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button