महाराष्ट्र ग्रामीण

कागल औद्योगिक वसाहतीत दुचाकी भिंतीला धडकून इचलकरंजीतील युवकाचा मृत्यू!

गोकुळ शिरगाव (सलीम शेख ) : कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये रविवारी वारी मध्यरात्री भरधाव वेगात दुचाकी चालवल्याने झालेल्या अपघातात इचलकरंजी येथील 25 वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. अवधूत युवराज सुतार असे मृत युवकाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अवधूत हा गोकुळ शिरगाव येथील एका कारखान्यात मालवाहतूक करत होता. रविवार रात्री त्याने आपला मालवाहनाचा टेम्पो कारखान्यात लावल्यानंतर मित्राची मोटरसायकल घेऊन तो रात्री सुमारे बाराच्या सुमारास इचलकरंजीकडे निघाला होता. कागल औद्योगिक वसाहतीमधून जात असताना भरधाव वेगामुळे त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि दुचाकी थेट संरक्षण भिंतीला धडकली.


सकाळी एका नागरिकाला अपघात झाल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता, दुचाकीच्या खाली अवधूतचा मृतदेह आढळून आला. गोकुळ शिरगाव पोलिसांनी तातडीने मृतदेहाची ओळख पटवून त्याच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला.
अवधूतचे वडील आणि भाऊ यांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर आपल्या मुलाचा आणि भावाचा मृतदेह पाहून एकच हंबरडा फोडला. या हृदयद्रावक दृश्याने परिसरात शोककळा पसरली होती.


पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. भरधाव वेगात दुचाकी चालवल्याने हा अपघात झाला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. या घटनेमुळे सुतार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पुढील तपास गोकुळ शिरगाव पोलीस करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button