Uncategorized

कोल्हापूर विभागाची बारावीच्या निकालात राज्यात दुसरी झेप; ९३.६४ टक्के निकाल, मुलींची बाजी!

कोल्हापूर (सलीम शेख ) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावी परीक्षेच्या निकालात कोल्हापूर विभागाने राज्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे. कोल्हापूर, सांगली आणि सातारा या तीन जिल्ह्यांचा मिळून एकूण निकाल ९३.६४ टक्के लागला आहे. कोल्हापूर जिल्ह्याने ९४.४० टक्क्यांसह विभागात अव्वल स्थान मिळवले आहे.
मुलींची चमकदार कामगिरी
यावर्षीही मुलींनी मुलांपेक्षा सरस कामगिरी करत बाजी मारली आहे. कोल्हापूर विभागात मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण मुलांपेक्षा ६.२१ टक्क्यांनी अधिक आहे.


विभागवार निकाल
कोल्हापूर विभागात एकूण १ लाख १३ हजार १९५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती, त्यापैकी १ लाख ६ हजार ४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विभागवार निकालाची आकडेवारी खालीलप्रमाणे आहे:
कोल्हापूर जिल्हा: ९४.४०%,सांगली जिल्हा: ९३.३९%, सातारा जिल्हा: ९२.७६%शाखानिहाय निकाल (कोल्हापूर विभाग),विज्ञान: ९८.६३%,वाणिज्य: ९४.५३%,व्यवसायिक: ९२.४०%,कला: ८१.६९%,आयटीआय: ८९.५७%
कोल्हापूर जिल्हा शाखानिहाय निकाल विज्ञान: ९९.०२%,,वाणिज्य: ९४.८५%,व्यवसायिक: ९३.७५%,कला: ८३.७२%,आयटीआय: ९०.४०%
आनंदाचे वातावरण


निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी आणि पालकांनी जल्लोष साजरा केला. शहरातील नेट कॅफे आणि घरोघरी मोबाईलवर निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांची झुंबड उडाली होती. उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे पेढे वाटून अभिनंदन करण्यात आले.विभागीय अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत निकालाची माहिती दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button