गांधीनगर १३ गावांच्या प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेचा आढावा; अडचणी सोडवण्याचे निर्देश!

गांधीनगर (सलीम शेख ) : गांधीनगर परिसरातील १३ गावांना पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करून देण्यासाठी आखण्यात आलेल्या जलजीवन कार्यक्रमांतर्गत सुधारित प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा आढावा घेण्यासाठी नुकतीच एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
माजी आमदार ऋतुराज संजय पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत, प्रकल्पांतर्गत येणाऱ्या गावांना पाणीपुरवठा योजनेच्या अंमलबजावणीमध्ये येत असलेल्या अडचणी जाणून घेण्यात आल्या. या अडचणी त्वरित सोडवण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना ऋतुराज पाटील यांनी यावेळी निर्देश दिले.
यावेळी, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष शशिकांत खोत, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे डेप्युटी इंजिनियर डी. के. पाटील, प्रभाकर गायकवाड, संजय चव्हाण, जगदीश काटकर, गोकुळचे संचालक प्रकाश पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाबासो माळी, शेतकरी संघाचे संचालक आनंदा बनकर, मोरेवाडी सरपंच ए. के. कांबळे, अमर मोरे, आशिष पाटील, पाचगावचे संग्राम पाटील, उचंगाव सरपंच मधुकर चव्हाण, वळिवडे सरपंच रूपाली कुसाळे, गोकुळ शिरगाव सरपंच चंद्रकांत डावरे, साताप्पा कांबळे, किरण आडसूळ, रावसाहेब पाटील, गांधीनगर सरपंच संदीप पाटोळे, प्रताप चंदवाणी, विनोद हजुराणी, न्यू वाडदे वसाहत सरपंच दत्तात्रय पाटील, कणेरी सरपंच निशांत पाटील, अर्जुन इंगळे यांच्यासह अनेक मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
या योजनेमुळे गांधीनगर परिसरातील १३ गावांना शुद्ध आणि पुरेसे पाणी मिळण्यास मदत होणार असल्याने, या योजनेच्या अंमलबजावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.