महाराष्ट्र ग्रामीण

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते भदंत आर. आनंद यांचा सत्कार; मुंबईत समता महोत्सव उत्साहात साजरा

कोल्हापूर (सलीम शेख) : मुंबई येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समतेच्या विचारांचा जागर करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मुंबईतील रंग शारदा सभागृह, बांद्रा (प.) येथे “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता महोत्सव २०२५” मोठ्या उत्साहात पार पडला. या महोत्सवाचे मुख्य आकर्षण ठरले ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभहस्ते आंतरराष्ट्रीय ख्यातीचे बौद्ध धर्मप्रसारक आणि पश्चिम महाराष्ट्र भिक्खू संघाचे अध्यक्ष, भदंत आर. आनंद यांचा करण्यात आलेला गौरव. आम्रपाली बुद्ध विहार वसगडे (ता. करवीर) येथील भदंत आर. आनंद यांच्या कार्याची यावेळी प्रशंसा करण्यात आली.
या महत्त्वपूर्ण सोहळ्याला अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. प्रमुख पाहुण्यांमध्ये प्रफुलभाई पटेल, सुनिलजी तटकरे, छगनराव भुजबळ, मंत्री नवाब मलिक, आर्थिक तज्ञ डॉ. नरेंद्र जाधव, सिने अभिनेते मिलिंद शिंदे, आंबेडकरी साहित्य संकलक रमेश शिंदे, सामाजिक कार्यकर्त्या संध्या पानसकर व प्रियदर्शनी जाधव यांचा समावेश होता.
कार्यक्रमात “शिंदेशाही ग्रुप” द्वारे सादर करण्यात आलेल्या भीमगीतांचा गजर आणि सांस्कृतिक कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिंकली. या समता महोत्सवाचे आयोजन मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष सिद्धार्थ टी. कांबळे यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना वंदन करत, समता आणि बंधुत्वाचा संदेश या महोत्सवातून देण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button