महाराष्ट्र ग्रामीण

कोल्हापुरात राजाराम बंधारा पाण्याखाली, वाहतूक विस्कळीत; पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन!

कोल्हापूर (सलीम शेख ) : गेल्या दोन दिवसांपासून कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली असून, कसबा बावड्याजवळील राजाराम बंधारा पाण्याखाली गेला आहे. प्रशासनाने तातडीने कार्यवाही करत या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद केली आहे.

राजाराम बंधारा पाण्याखाली गेल्याने कसबा बावड्याकडून शहरात येणाऱ्या आणि शहरातून कसबा बावड्याकडे जाणाऱ्या कर्मचाऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाने नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.


सद्यस्थितीत, या मार्गाने ये-जा करणाऱ्या नागरिकांना शिवाजी पुलावरून वळून जावे लागत आहे. यामुळे प्रवासाचे अंतर वाढले असून, वेळेचाही अपव्यय होत आहे. नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि अनावश्यक प्रवास टाळावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास जिल्ह्यातील इतर बंधारेही पाण्याखाली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे आणि प्रशासनाच्या सूचनांकडे लक्ष द्यावे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button