महाराष्ट्र ग्रामीण

गोकुळ शिरगाव: छत्रपती शाहू महाराज नगरमध्ये २० वर्षांपासून रस्ते आणि मूलभूत सुविधांची प्रतीक्षा!

गोकुळ शिरगाव (सलीम शेख ) : कोल्हापूर जिल्ह्यातील एक प्रगत गाव म्हणून ओळखले जाणारे गोकुळ शिरगाव, राष्ट्रीय महामार्गामुळे पूर्व आणि पश्चिम अशा दोन भागांमध्ये विभागले गेले आहे. यापैकी, पूर्वेकडील छत्रपती शाहू महाराज नगर गेल्या दोन दशकांपासून मूलभूत सुविधांच्या अभावामुळे विकासापासून वंचित राहिले आहे. येथील मुख्य रस्ते आणि अंतर्गत रस्ते गेली २० वर्षे अपूर्ण अवस्थेत असून, गटारी, पथदिवे आणि पाणीपुरवठा यांसारख्या अत्यावश्यक सुविधांचीही वानवा आहे.

स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, काही ठिकाणी जे रस्ते तयार झाले आहेत, त्यांची अवस्था गटारीचे पाणी रस्त्यावर येऊन अत्यंत बिकट झाली आहे. यामुळे रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली असून, नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.


या गंभीर समस्येबाबत ग्रामपंचायतीकडे वारंवार निवेदने आणि तक्रारी देऊनही परिस्थितीत कोणतीही सुधारणा झालेली नाही. प्रशासनाच्या या उदासीनतेमुळे छत्रपती शाहू महाराज नगरमधील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. मूलभूत सुविधांसाठी गेली २० वर्षे प्रतीक्षा करावी लागत असल्याने, येथील रहिवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. यावर ग्रामपंचायत कधी लक्ष देणार आणि नागरिकांना कधी दिलासा मिळणार, हा प्रश्न अनुत्तरित आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button